संस्थेविषयी माहिती

             अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून भारताच्या विविध प्रांतातील इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन करण्याची संकल्पना अंमलात आणली जाते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र संघटन तयार करण्यात आले, आणि त्याला इतिहास संकलन समिती असे संबोधन देण्यात आले.

              कोल्हापूरच्या इतिहासाचा व्यापक अभ्यास करण्यासाठी इतिहास संकलन समिती कोल्हापूरची स्थापना दिनांक २३ डिसेंबर २००८ रोजी मा. हरिभाऊ वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. अर्थात यापूर्वीपासूनच या दिशेने कोल्हापूरात काम सुरु झालेले होतेच. ज्येष्ठ प्रचारक कै. राजाभाउ भोसले यांच्या पुढाकारातून आणि श्री भा. शि. इंदुलकर, श्री जगदीश धर्माधिकारी, सौ पेठे, विद्याधर कुलकर्णी या ज्येष्ठ मंडळींनी या कार्याची मुहुर्तमेढ तीन चार वर्षापूर्वीच रोवली होती. श्री राजाभाउंच्या निधनानंतर कार्याची गती मंदावली. डॉ. आनंद दामले यांच्याकडे कोल्हापूर समितीच्या पुनर्गठनाची जबाबदारी सोपविण्यात आली. दामले सरांनी कुशलतापूर्वक अनेक नवीन कार्यकर्ते एकत्र केले आणि काही बैठका झाल्यानंतर अधिकृतपणे समिती स्थापन झाली.

               अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून भारताच्या विविध प्रांतातील इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन करण्याची संकल्पना अंमलात आणली जाते. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक प्रांतात एक स्वतंत्र संघटन तयार करण्यात आले, आणि त्याला इतिहास संकलन समिती असे संबोधन देण्यात आले. कोल्हापूरच्या इतिहासाचा व्यापक अभ्यास करण्यासाठी इतिहास संकलन समिती कोल्हापूरची स्थापना दिनांक २३ डिसेंबर २००८ रोजी मा. हरिभाऊ वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. अर्थात यापूर्वीपासूनच या दिशेने कोल्हापूरात काम सुरु झालेले होतेच. ज्येष्ठ प्रचारक कै. राजाभाउ भोसले यांच्या पुढाकारातून आणि श्री भा. शि. इंदुलकर, श्री जगदीश धर्माधिकारी, सौ पेठे, विद्याधर कुलकर्णी या ज्येष्ठ मंडळींनी या कार्याची मुहुर्तमेढ तीन चार वर्षापूर्वीच रोवली होती. श्री राजाभाउंच्या निधनानंतर कार्याची गती मंदावली. डॉ. आनंद दामले यांच्याकडे कोल्हापूर समितीच्या पुनर्गठनाची जबाबदारी सोपविण्यात आली. दामले सरांनी कुशलतापूर्वक अनेक नवीन कार्यकर्ते एकत्र केले आणि काही बैठका झाल्यानंतर अधिकृतपणे समिती स्थापन झाली. अध्यक्ष प्रिं अमरसिंह राणे सर, उपाध्यक्ष डॉ. बी. डी. खणे, सचिव डॉ. आनंद दामले. सहसचिव उमाकांत राणिगा, सहसचिव प्रसन्न मालेकर या प्रमुख कार्यकारिणी बरोबरच डॉ. आरेन हर्डीकर. प्रा. लक्ष्मणराव खोत, श्री अ.ब. करवीरकर, डॉ. अमर आडके, प्रा.अ.रा. जयतीर्थ, श्री शशीकांत सोळांकुरकर अशी सर्व क्षेत्रातील मंडळी समितीत येत गेली. महिला वर्गातूनपण चांगला प्रतिसाद मिळाला. डॉ. सुप्रिया जोशी, श्रीमती अरुणा देशपांडे. डॉ. नीला जोशी, सौ वैशाली गोखले अशा मान्यवर विदुषी समितीला जोडल्या गेल्या. एक उत्तम संघटन तयार झाले. पैठण आणि नासिक या प्राचीन शहरांच्या इतिहासाचा अभ्यास, चर्चासत्र, संपादन आणि ग्रंथप्रकाशन या क्रमाने अखिल भारतीय पातळीवरील संकल्पानुसार काम झालेले होते. आता कोल्हापृच्या इतिहासग्रंथाची सिद्धता करण्याची जबाबदारी कोल्हापूर समितीने स्वीकारली. विषय निश्चिती. त्या त्या विषयावरील तज्ञ अभ्यासकांचा शोध घेणे, आर्थिक नियोजन, चर्चासत्राची रचना व पूर्वतयारी या सर्व बाबी समितीने समर्थपणे पेलल्या.

               कोल्हापुरातील भालजी पेंढारकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी आदरणीय डॉ. गो. बं देगलूरकर सरांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसाचे राज्य पातळीवरील चर्चासत्र यशस्वीपणे संपन्न झाले. दि.९,१०, व ११ ऑक्टोबर २००९ या तीन दिवस चाललेल्या चर्चासत्राला अभूतपूर्व यश मिळाले. सोबतच कोल्हापूरातील ज्येष्ठ चित्रकार रविंद्र मेस्त्री यांनी चितारलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित चित्रकृतींचे आणि श्री शशिकांत सोळांकुरकर याच्या संग्रहातील दुर्मिळ प्राचीन नाण्यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. चर्चासत्राच्या यशानंतर ग्रंथसिद्धतेची तयारी जोरात सुरु झाली. चचर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मान्यवर अभ्यासक आणि विद्वान मंडळी समितीशी जोडली गेली. सर्वाच्या अथक परिश्रमातून ‘युगयुगीन करवीर, इतिहासदर्शन’ हा ग्रंथ दि.३१ ऑक्टोबर २०१० या दिवशी मोठ्या दिमाखात प्रकाशित झाला. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षपदी करवीरचे छत्रपती श्रीमंत शाहु महाराज आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभासाठीडॉ. देगलूरकर सर, डॉ. चिं. ना. परचुरे, श्री विजय कुवळेकर यासारख्या मान्यवरांचा सहभाग कार्यक्रमाची उंची वाढविणारा ठरला. सुमारे ४०० पृष्ठसंख्या असलेल्या या संदर्भग्रंथाचे प्रकाशनपूर्व नोंदणीमुल्य रु/१०० इतके नाममात्र ठेवल्यामुळे अल्पावधीतच सर्व आवृतीचे वितरण पूर्ण झाले. इतिहासप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे या ग्रंथाची दुसरी आवृती प्रकाशित करण्याचा योग आला. त्यावेळी काही नवीन विषयांवरील लेखांचा समावेश करून दि.८ फेब्रुवारी २०१४ या दिवशी श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्याच अध्यक्षतेखाली महामहीम पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (राज्यपाल, बिहार) यांच्या शुभहस्ते आणि डॉ. बी. एम. हिडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसरी आवृती प्रकाशित झाली. अल्पावधीतच या आवृत्तीच्या १००० प्रतीपण संपल्या. समितीच्या एकजुटीचे आणि परिश्रमाचे हे उत्तम उदाहरण ठरले. इतकेच नव्हे तर हा ग्रंथ अनेक ठिकाणी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगात आणला गेला, या यशामुळे समितीचा आत्मविश्वास वाढण्यास मोठीच मदत झाली. याबरोबरच समितीच्या वतीने इतिहासाशी संबंधित व्याख्यानांचे पण वेळोवेळी नियोजन करण्यात आले. दि १२ एप्रिल या दिवशी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वसंतराव मोरे सरांचे ‘पानपतचा रणसंग्राम, एक तेजस्वी शौर्यगाथा’ या विषयावर व्याख्यान झाले, मान, श्री हरिभाउ बने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

               आपल्या समितीचे एक सदस्य, मा. श्री विजयराव शिंदे यांनी मूळ हिंदीतून मराठीत अनुवादित केलेल्या बृहत्तर आसामच्या ऐतिहासिक कथा’, ‘आणि ब्रम्हपुत्रेच्या किनाऱ्या किनाऱ्याने’ या दोन सुंदर ग्रंथांचा प्रकाशन सोहळा २४ जुलै २०११ रोजी संपन्न झाला, महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे गडकोटांचा गिरीदुर्गाचा इतिहास असे म्हटले जाते. म्हणूनच समितीच्या वतीने दुर्गस्थापत्य या विषयावर राज्यव्यापी चचर्चासत्र घेण्यात आले. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांच्यावर या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली. दि. १७ व १८ जानेवारी २०१५ या दिवशी ऐतिहासिक पन्हाळगडावरील संजीवन सिटी येथे ही परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी म्हणजे कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव. या देवतेच्या मूतींची मंदिरात पुनर्स्थापना झाली त्याची ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा अभ्यास करून समितीने कोल्हापूरच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण असा दिवस म्हणून दि २६ सप्टेंबर हा कोल्हापूरचा इतिहासदिन म्हणून प्रतिवर्षीं साजरा करण्याचा निर्णय घेतला, २०१५,२०१६,२०१७,२०१८ व२०१९ या वर्षों या दिवशी या ऐतिहासिक प्रसंगातील ट्कांच्या वंशजांचा सन्मान करून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. (नंतरच्या काळात कोरोनाच्या विश्वव्यापी सकटामुळे यात खड़ पडला.)

             आपल्या संस्थेच्या उभारणीत अत्यंत मोलाचा वाटा असलेले संस्थापक अध्यक्ष प्रि अमरसिंह राणे सरांच्या दुखद निधनानंतर समितीची पुनर्रचना करण्यात आली. त्याचबरोबर संस्था निर्मीतीच्या संपूर्ण प्रक्रियेत अगदी प्रारंभापासून धडाडीने कार्यरत असलेल्या डॉ. आ.नी दामले सरांनी कोल्हापूरहून पुणे येथे कायम स्वरुपी प्रस्थान केले. सरांच्या विनंतीनुसार समितीच्या कार्यकारिणीची नव्याने मांडणी केली गेली, सध्याची नवीन कार्यकारिणी संस्थेच्या परिपत्रकावर देण्यात आलेली आहे.अलिकडे कोल्हापूरच्या समितीचे काम थोडे मंदावले आहे ही गोष्ट मान्य करायलाच हवी. कोरोना, ज्येष्ठ सदस्यांचा शहर सोडल्यामुळे थांबलेला सहभाग, काही सदस्यांचे निधन अशा अनेक कारणामुळे आलेले शैथिल्य दूर करुन कोल्हापुर समिती पुन्हा नव्या जोमाने कार्यरत होईल असा सदस्यांना विश्वास वाटतो. कोल्हापूरच्या श्री शंकराचार्य मठाच्या इतिहासाचे लेखन समितीच्या सदस्यांनी पूर्ण केले आहे. कोल्हापूरचे ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वराच्या मंदिराची माहिती पुस्तिका पण तयार आहे. कोल्हापूरच्या पश्चिमेस असलेल्या वाकरे गावातील बारवशिल्पाचे संशोधन कार्य करण्यासाठी त्या ग्रामपंचायतीचे विनंतीपत्र संस्थेला प्राप्त झाले आहे. दुर्गस्थापत्य परिषदेत सादर झालेल्या शोधनिबंधावर आधारित ग्रंथाच्या निर्मितीची प्रक्रिया चालु आहे. तरुण सदस्यांचा शोध घेउन त्यांना समितीच्या प्रवाहात सामील करुन घेण्याचे प्रयत्न पण चाल आहेत, कालमाननुसार ज्येष्ठ सदस्यांची जागा येणारी नवीन पिढी जाणीवपूर्वक कार्यरत रहावी अशी सदस्यांची मनोभावना आहे. त्यादिशेने समितीचे काम चालु आहे.

 

Scroll to Top